राजकियसामाजिक

कार्तिकी यात्रेत टोकन दर्शन पद्धत

प्रशासकीय हालचाली झाल्या गतिमान

पंढरपूर (प्रतिनिधी)

यंदाची आषाढी वारी सर्वार्थाने गाजत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ,राज्य सरकार
भाविकांवर फिदा आहेत. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. याचवेळी कोणताही धाक नसल्याने, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही मनापासून काम करणे सुरू केले आहे. याचाच परिणाम म्हणून, पंढरीत नवनवीन संकल्पना राबण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

परवाच विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी
आषाढी यात्रेतील पालखी तळ आणि इतर ठिकाणांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह पंढरीतील प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी
विठुरायाच्या दर्शनाबाबत नवीन संकल्पना मांडली.
पुढील कार्तिकी यात्रेत टोकन दर्शन पद्धत सुरू करण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

ज्या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, १५ लाखाहून जास्त भाविकांची संख्या असते, अशा ठिकाणी दर्शनाला खूप वेळ लागतो. परिणामी भाविकांना त्रास सहन करावा लागतो. अशा ठिकाणी टोकन दर्शन पद्धत आहे. पंढरीतही कार्तिकी यात्रेवेळी ही पद्धत सुरू करण्यात येईल, याबाबत त्यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला सूचना दिल्या. यावर्षीच्या आषाढी वारीने पालखी सोहळ्यातील दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. पंढरपूर नगरपरिषदेला १० कोटी रुपयांचा निधी, यासह मराठा भवन, लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीला विशेष निधी यासह अनेक गोष्टी आषाढी यात्रेच्या निमित्ताने नागरिकांना मिळाल्या. आता कार्तिकी यात्रेपासून टोकन दर्शन पद्धत सुरू होईल, या कामी सध्याचे हलकेफुलके वातावरणच कारणीभूत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close