राजकिय

विठ्ठलमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीन हजार कोटी रुपयांचा फायदा

अभिजीत पाटलांनी उभारली ऊसदर स्पर्धा

पंढरपूर (प्रतिनिधी)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात ऊसदराची चढाओढ लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल २६०० ते ३००० कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचे गणित विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मांडले आहे. त्यांच्या या संकल्पनेचे मोठे कौतुक
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना ज्यावेळी बंद होता, त्यावेळी अनेक साखर कारखानदारांनी त्यांची कारखानदारी जगवली. शेतकऱ्यांना अत्यल्प ऊसदर देऊन साखर कारखाने उभारले. विठ्ठल कारखाना ज्यावेळी सुरू झाला, त्यावेळी अभिजीत पाटील यांनी प्रथमच शेतकऱ्यांना २५०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे घोषित केले. आणि याच वर्षापासून ऊसदराची चढाओढ सुरू झाली. शेतकऱ्यांची थकीत ४० कोटी रुपयांची ऊसबिले देऊन त्यांनी २५०० रुपयांचा ऊसदर शेतकऱ्यांना दिला. त्याच वर्षापासून जिल्ह्यात
शेतकऱ्यांना नाडणाऱ्या साखर कारखानदारीला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली.

मागील गळीत हंगामात
प्रतिटन ३००० रुपयांचा ऊसदर देण्याची हमी प्रथमच अभिजीत पाटील यांनी दिली. आणि साखर कारखानदारांची झोप उडाली. आता यावर्षी उसाला ३५०० रुपये प्रतिटन भाव देण्याची घोषणा अभिजीत पाटील यांनी माढा तालुक्यातील सभेत दिली. आणि येथूनच ऊस दराच्या स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे २६०० ते ३००० कोटी रुपयांचा फायदा होणारे आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामुळे जिल्ह्यात ऊस दरात स्पर्धा निर्माण झाली असल्याचे, शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close