ईतर

बनावट कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान

पंढरपूर (प्रतिनिधी)

बनावट कीटकनाशक तयार करून , शेतकऱ्यांना विकणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, राज्याच्या कृषी संचालकांनी दिले आहेत. यामुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव आणि अनवली येथील फळबागा कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे जळाल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी शेतकऱ्यांनी या कंपनी विरोधात तक्रारी केल्या होत्या. यावर कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणी दरम्यान कीटकनाशकामध्ये तणनाशक असल्याचे आढळून आले. यामुळे कंपनीत बनावट कीटकनाशक बनवण्यात येत असल्याचे दिसून आले होते. परंतु या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता.

याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैय्या देशमुख यांनी आवाज उठवला. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्रालयासमोर आंदोलन केले. यावेळी कृषी संचालकांनी संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश आल्याची चर्चा येथील शेतकऱ्यांमधून होत होती. कंपनीविरोधात गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्या आजवरच्या वर्तनामुळे पुढे काय होणार ? याकडे संशयास्पद रीतीने शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close