सामाजिक

भाविकांसाठी राबती पंढरपूरकरांचे हात

करंडे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तीन दिवस अन्नदान

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूरची आषाढी यात्रा म्हटले की, पुण्यापासून पंढरपूरपर्यंत अन्नदानाचा झपाटा लागलेला दिसतो.
पंढरीत पायी चालत येणाऱ्या लाखो भाविकांना दिलासा देण्याचे काम पंढरपुरातील करंडे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सोमवारी
त्यांच्याकडून अन्नदानाला सुरुवात झाली. आता तीन दिवस या ठिकाणी अनेकांचे हात दिवसरात्र राबणार आहेत.

पंढरीतील उद्योजक मीनाक्षीताई करंडे, त्यांचे सहकारी शिवाजी उर्फ बंडू भोसले आणि युवराज क्षीरसागर यांच्या वतीने येथील सरगम चौक येथे, दरवर्षीच भाविकांसाठी मोफत भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दरवर्षी या ठिकाणी तीन लाख भाविक भोजनाचा आस्वाद घेतात, अशी माहिती मीनाक्षीताई करंडे यांनी दिली आहे.

पुण्यापासून जसजशा पालख्या पंढरपूरकडे प्रयाण करतात, तसं तसे भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते. पंढरपूरमध्ये प्रवेश करताच,
येथील सरगम चौकात मोफत महाप्रसाद सुरू असल्याचे भाविकांना दिसते. येथूनच पंढरीतील अनेक अन्नछत्रांना सुरुवात होते. या ठिकाणी भाविक भोजनाचा स्वच्छंदीपणे आनंद लुटताना दिसतात. भाविकांच्या सेवेतच विठुरायाची सेवा केल्याचा आनंद मिळतो, जनसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे मत या महाप्रसादालयाचे आयोजक मीनाक्षीताई करंडे, शिवाजी भोसले आणि युवराज क्षीरसागर
यांनी व्यक्त केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close