सामाजिक

अवैध धंद्यांविरोधात युवक मैदानात

पांढरेवाडीतील स्मशानभूमीतच धरले आमरण उपोषण

पंढरपूर (प्रतिनिधी)

करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे चालत असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या. आता करकंब पोलीस ठाण्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पांढरेवाडी गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी, बाळासाहेब चिखलकर नावाच्या युवकाने कंबर कसली आहे. मागील अनेक दिवसापासून त्यांचे हे प्रयत्न सुरू असून, आता चक्क पांढरेवाडी गावच्या स्मशानभूमीतच आमरण उपोषण छेडले आहे.

पांढरेवाडी गावात अवैध दारू धंदे, मटका व जुगार धंद्यांना उत आला आहे. या गावातील अनेक कुटुंबांची दारुमुळे वाताहात झाली आहे. समाजाला हानी पोहोचवणारे हे अवैध धंदे बंद करण्यासाठी, येथील तरुण अनेक दिवसापासून झगडत आहे. शुक्रवार दि.
१९ जुलैपासून त्यांनी येथील स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाकडे पांढरेवाडी गावातील पुरुष वर्गाने पाठ फिरवली असली तरी, येथील महिला वर्गाने
या उपोषणास उचलून धरले आहे. महिलांचा वाढता पाठिंबा वाढतच राहिल्यास, हे उपोषणरुपी आंदोलन काही दिवसातच उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी करकंब पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन येथेच न थांबता
कोल्हापूर परिक्षेत्रापर्यंत पोहोचले होते. मागील काही दिवसापूर्वी काही दिवस येथील अवैध धंदे बंद करण्यात आले होते. परंतु पुन्हा या धंद्यांनी डोके वर काढल्याने, बाळासाहेब चिखलकर यांच्या आंदोलनाची धार वाढली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close