
पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे उमेदवार अनिल सावंत यांना आमदार करा, मंगळवेढा तालुक्यावरील जलसंकट दूर करून या भागाचे नंदनवन करू, अनिल सावंत यांच्या उद्योगशील दूरदृष्टीने मोठे उद्योग उभारून , बेरोजगारांना काम देऊ ,असा विश्वास खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना दिला. यावेळी उमेदवार अनिल सावंत यांनीही
मतदारांना साद घातली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारानिमित्त भेट दौऱ्याचे आयोजन केले होते. तालुक्यातील आंधळगाव, भोसे, लवंगी या ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या. यावेळी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले.
शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. अनिल सावंत आमदार झाले की, दुष्काळी भागात पेशवाई राहणार नाही. महाविकास आघाडीकडून पंचसूत्री योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषीसमृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना ३ लाखापर्यत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडीसाठी ५० हजार रु. प्रोत्साहनपर अनुदान, राज्यातील सर्व नागरिकांना मोफत औषध, कुटुंब रक्षण २५ लाखांपर्यंत आरोग्य विभा मोफत देण्यात येणार आहे. महालक्ष्मी योजनेतून महिलांसाठी दरमहा ३००० रु. , महिला व मुलींसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
अनिल सावंत यांना आमदार करून आपण विधानसभेत पाठवावे, आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचे नंदनवन करून , शेतीला पाणी मिळवून देणार असे प्रतिपादन खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी केले. मंगळवेढ्यातील लवंगी या ठिकाणी खा. धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी उमेदवार अनिल सावंत बोलताना म्हणाले की,गेल्या कित्येक वर्षापासून मंगळवेढा तालुक्यातील हा दुष्काळी भागातील पाणी प्रश्न असाच प्रलंबित पडला आहे.मला एकदा संधी देऊन बघा या भागातील पाणी प्रश्न आमदार झाल्यावर लगेच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंगळवेढा तालुक्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. उद्योग कमी असल्यामुळे हजारो तरुण बेरोजगार आहेत. नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते राहुल शहा, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस फिरोज मुलाणी, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर काझी, काशीनाथ पाटील, राजू मेथकुटे, लवंगीचे आप्पासाहेब माने, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष वृषाली इंगळे, आंधळगाव सरपंच लव्हाजी लेंडवे, माजी सरपंच तुकाराम चव्हाण, सागर गुरख, विजय बुरकुल, नानासो करपे, जमीर इनामदार, पंडीत गवळी, वृषाली इंगळे, माणीक गुंगे, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.