सामाजिक

रस्ता झाला अन रस्त्यावर पथदिवेही उजळले

समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचा करिष्मा

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर शहरात समाजसेवक संजयबाबा ननवरे यांचा करिष्मा वरचेवर वाढतच असून,
पंढरपूर शहरातील पायाभूत सुविधांमध्ये त्यांच्यामुळे मोठा फरक पडत आहे. त्यांच्या या कामामुळे शहरातील नागरिक मोठे खुश आहेत.
सुरुवातीला नागरिकांच्या मदतीला धावण्यापर्यंत त्यांची ख्याती होती. परंतु यानंतर त्यांनी सामाजिक कार्यक्रमात भाग घेणे सुरू केले. आणि बघता बघता असंख्य कामे त्यांच्या हातून घडून गेली.

मागील काही वर्षाच्या काळात संजय ननवरे हे नाव मदत कार्यासाठी पुढे होते. समाजातील गरजूंना आर्थिक मदत करण्यात त्यांचा हातखंडा होता.
परंतु पुढे जाऊन त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. नागरिकांनी त्यांच्या कानात सांगावे, आणि त्यांनी प्रशासनाला धारेवर धरावे. एका पाठोपाठ एक अशी झपाझप कामे मार्गी लागत गेली. अल्पावधीतच ते समाजसेवक म्हणून पुढे आले.

आजवर त्यांनी अनेक नादुरुस्त रस्ते, गटारी, श्री विठ्ठल मंदिरातील हंगामी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांना हात घातला. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी झेंडे गल्ली येथील उखळीकर महाराज मठ ते नरहरी सोनार मठापर्यंतच्या रस्त्याबाबत आवाज उठवला होता. यानंतर हा रस्ता बनवून झाला होता. आषाढी एकादशी सोहळा तोंडावर आला आहे. येथील रस्त्यावर भाविकांची मोठी वर्दळ असते, यामुळे या रस्त्यावर स्ट्रीट लाईटची सोय करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत होती. येथील तीन विद्युत खांबावर पथदिवे नव्हते. यावर संजय बाबा ननवरे यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, आणि चक्क दुसऱ्याच दिवशी हे पथदिवे बसवण्यात आले.यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. समाजसेवक संजयबाबा ननवरे यांच्या समाजसेवेचे फळ येथील नागरिकांना मिळाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close